अनुच्छेद ७ : स्थलांतर करून..व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :
भारतीय राज्यघटना
भाग दोन :
अनुच्छेद ७ :
स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :
अनुच्छेद ५ व ६ यामध्ये काहीही असले तरी,जी व्यक्ती, १ मार्च १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे, ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही :
परंतु असे की, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रांत याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर, पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी, कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे, तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद ६ खंड (ख) च्या प्रयोजनांकरता, अशी प्रत्येक व्यक्ती १९ जुलै १९४८ या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.