Constitution बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब)

भारताचे संविधान ( राज्यघटना )
१.(बारावी अनुसूची :
(अनुच्छेद २४३ब)
नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
१) नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन.
२) जमिनींच्या वापराचे व इमारतींच्या बांधकामाचे विनियमन.
३) आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन.
४) रस्ते व पूल.
५) घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक प्रयोजनार्थ पाणीपुरवठा.
६) सार्वजनिक आरोग्य, स्वच्छताविषयक निगराणी व घन कचरा व्यवस्थापन.
७) अग्निशमन सेवा.
८) नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण व परिस्थितिकीय घटकांचे प्रवर्धन.
९) अपंग व मतिमंद यांच्यासह समाजीतील दुर्बल घटकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे.
१०) गलिच्छ वस्ती सुधारणा व तिचा दर्जा उंचावणे.
११) नागरी क्षेत्रातील दारिद्रय कमी करणे.
१२) उपवने, उद्याने, क्रीडांगणे यांसारख्या नागरी सोयी व सुविधांची तरतूद करणे.
१३) सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक दृष्टीकोनाचे प्रवर्धन.
१४) दफन व दफनभूमी; दहन, दहनभूमी; व विद्युत दाहिनी.
१५) गुरांचा कोंडवाडा, पशुंवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे.
१६) जीवनविषयक आकडेवारी, जन्म व मृत्यु नोंदणीसह.
१७) सार्वजनिक सुविधा, रस्त्यावरील दिवाबत्ती, वाहनतळे, बसथांबे व सार्वजनिक सोयींसह.
१८) कत्तलखाने व कातडी कमावण्याचे कारखाने यांचे विनियमन.)
——–
१. संविधान (चौऱ्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम १९९२ याच्या कलम ४ द्वारे जादा दाखल केली (१ जून १९९३ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply