Constitution अनुच्छेद ४३क : उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४३क :
१.(उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग :
राज्य, कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम, आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनांमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करील.)
————-
१.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या अधिनियमाच्या कलम ९ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply