भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-यछ :
निवडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध :
या संविधानात काहीही अंतर्भूत असले तरी,–
(क) अनुच्छेद २४३-यक अन्वये केलेले किंवा करण्याचे अभिप्रेत असलेले, मतदारसंघांचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघांमध्ये जागांची वाटणी यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही ;
(ख) कोणत्याही नगरपालिकेची कोणतीही निवडणूक, राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा तदन्वये, तरतूद केलेल्या अशा प्राधिकाऱ्याकडे आणि तशा रीतीने, निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज, अन्य रीतीने प्रश्नास्पद करता येणार नाही. )