Bnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५० :
विनादोषारोप सुटका :
१) आरोपी, कलम २३२ अन्वये दोषारोप केल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषमुक्तीसाठी अर्ज करु शकतो.
२) खटल्याचा अभिलेख आणि त्यासाबत सादर केलेले कागदपत्र विचारात घेतल्यावर आणि आरोपी व फिर्यादीपक्ष यांची याबाबतची निवेदने ऐकल्यानंतर जर, आरोपीच्या विरूध्द कार्यवाही करण्यास पुरेसा आधार नाही असे न्यायाधीशाला वाटले तर, तो आरोपीला विनादोषारोप सोडून देईल आणि तसे काण्यामागची आपली कारणे नमूद करील.

Leave a Reply