अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम २२ :
सद्भावपूर्वक केलेल्या कार्यवाहीला संरक्षण :
या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा शासनाचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी किंवा अन्य कोणतीही व्यक्ति यांच्या विरुद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य वैध कार्यवाही दाखल करता येणार नाही.