अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७६ :
अपील :
१) विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे किंवा आदेशामुळे, व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती केन्द्र सरकारने विहित केलेले शुल्क (फी) आणि दंड, नुकसान भरपाई किंवा मोबदल्याच्या स्वरुपात जी या अधिनियमानुसार लादली असेल तर ती रक्कम जमा करुन, आदेश प्राप्त झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत उच्च न्यायालयास अपील करु शकेल :
परंतु असे की, उच्च न्यायालयाला, अपील करणाऱ्याला या कालावधीत अपील करण्यास प्राधान्य देण्यापासून पुरेशा कारणास्तव रोखले गेल्याचे समाधान झाल्यास, पंचेचाळीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर कोणतीही अपील स्वीकारता येईल.
२) या कलमान्वये करण्यात आलेल्या अपीलाचा निपटारा (निकाल) उच्च न्यायालयाचे खंडपीठ करेल ज्यात कमीत कमी दोन न्यायाधीश असतील.