अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७५ :
नियमित न्यायालयांकडे खटले हस्तांतरित करण्याचे अधिकार (शक्ती) :
जेव्हा विशेष न्यायालयाचे कोणत्याही अपराधाची दखल घेतल्यानंतर असे मत झाले की, हा खटला आपण चालवू शकत नाही, तेव्हा त्यांच्या गुन्हा चालविण्याच्या अधिकारतेत नसले तरी, फौजदारी प्रक्रिय संहिता १९७३ (आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३) अन्वये अधिकारिता असलेल्या न्यायालयाकडे हस्तांतरित करेल व हस्तांतर केलेले न्यायालय आपणच त्या गुन्ह्याची दखल घेतली आहे असे समजून खटल्याची पुढील कार्यवाही करील.