Fssai कलम ४२ : खटला चालविण्याची प्रक्रिया :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४२ :
खटला चालविण्याची प्रक्रिया :
१) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी, अन्न (खाद्य) व्यवसायाचे निरीक्षण (तपासणी) करणे, नमुने घेणे आणि विश्लेणासाठी अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठविणे, यासाठी जबाबदार असेल.
२) अन्न (खाद्य) विश्लेषक, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याकडून नमुना प्राप्त केल्यानंतर, नमुन्याचे विश्लेषण करील आणि चौदा दिवसांच्या आत विश्लेषण अहवाल नमुने घेणे आणि विश्लेषणाची विनिर्दिष्ट पद्धती उल्लेखित करीत निर्देषित अधिकाऱ्याला पाठविल व त्याची एक प्रत अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताला पाठविल.
३) निर्देशित अधिकारी अन्न (खाद्य) विश्लेषकाकडून आलेल्या अहवालाचे विश्लेषण करील व उल्लंघनाचे स्वरुप कारावासाच्या शिक्षेस पात्र आहे किंवा फक्त द्रव्यदंडास पात्र आहे याचा निर्णय करुन, उल्लंघनाचे स्वरुप कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास चौदा दिवसांच्या आत त्यासाठी शिफारस करुन अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताकडे खटला दाखल करण्यासाठी मंजुरीकरता पाठवेल.
४) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, त्यांना योग्य वाटल्यास, केन्द्र सरकारने विहित केलेल्या कालावधीत अपराधाच्या गंभीरतेनुसार, प्रकरण,-
(a) क) तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा असलेल्या अपराधाच्या बाबतीत सर्वसाधारण अधिकारिता असलेल्या न्यायालयाकडे पाठविण्यासाठी निश्चित करेल; किंवा
(b) ख) तीन वर्षापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा असेलेल्या अपराधाच्या बाबतीत विशेष न्यायालयाकडे पाठविण्याचे निश्चित करेल आणि जेथे विशेष न्यायालयांची स्थापना नसेल तेथे अशी प्रकरणे सामान्य अधिकारीता असेलेली न्यायालये पाहतील.
५) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त आपला निर्णय निर्देशित अधिकारी व संबंधित अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास कळवतील जेणेकरुन अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी सामान्य अधिकार असलेल्या न्यायालयात किंवा विशेष न्यायालयात खटला दाखल करेल आणि नमुना कलम ४० अन्वये घेतला असल्यास तो ही माहिती खरेदीदरासही देईल.

Leave a Reply