भारताचे संविधान ( राज्यघटना )
१.(प्रकरण चार :
मालमत्तेचा हक्क :
अनुच्छेद ३००-क :
कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे :
कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही.)
———-
१. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३४ द्वारे हे प्रकरण समाविष्ट केले (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).