भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७५ :
राज्यपालाचा सभागृहास किंवा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क :
(१) राज्यपाल, विधानसभेस किंवा, विधानपरिषद असणाऱ्या राज्याच्या बाबतीत, त्या राज्याच्या विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहास, किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करू शकेल आणि त्या प्रयोजनाकरता सदस्यांना उपस्थित राहणे आवश्यक करू शकेल.
(२) राज्यपाल, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाला किंवा सभागृहांना, संदेश पाठवू शकेल—–मग तो विधानमंडळामध्ये त्यावेळी असलेल्या एखाद्या विधेयकाबाबत असाो किंवा अन्य प्रकारचा असो —आणि ज्याला याप्रमाणे कोणताही संदेश पाठविण्यात आला आहे ते सभागृह, त्या संदेशानुसार ती बाब विचारात घेणे आवश्यक असेल अशी कोणतीही बाब सोयीनुसार शक्य तितक्या त्वरेने विचारात घेईल.