Bnss कलम ९२ : उपस्थिती बंधपत्राचा किंवा जामीनपत्राचा भंग केल्यास अटक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ९२ :
उपस्थिती बंधपत्राचा किंवा जामीनपत्राचा भंग केल्यास अटक :
न्यायालयापुढे उपस्थित राहण्यासाठी, या संहितेखाली लिहून घेतलेल्या कोणत्याही बंधपत्राने जामीनपत्राने जी बांधलेली असेल अशी कोणतीही व्यक्ती उपस्थित राहिली नाही तर, न्यायालयातील पीठासीन अधिकारी, अशा व्यक्तीला अटक करण्यात यावी व तिला आपल्यापुढे हजर केले जावे असे निदेशित करणारे वॉरंट काढू शकेल.

Leave a Reply