माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ३० :
अडचणी दूर करण्याचा अधिकार :
१)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचन उद्भवली तर, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचन दूर करण्यासाठी त्यास आवश्यक वा इष्ट वाटतील अशा, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
२)या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर,संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल.