Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५० :
विनादोषारोप सुटका :
१) आरोपी, कलम २३२ अन्वये दोषारोप केल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषमुक्तीसाठी अर्ज करु शकतो.
२) खटल्याचा अभिलेख आणि त्यासाबत सादर केलेले कागदपत्र विचारात घेतल्यावर आणि आरोपी व फिर्यादीपक्ष यांची याबाबतची निवेदने ऐकल्यानंतर जर, आरोपीच्या विरूध्द कार्यवाही करण्यास पुरेसा आधार नाही असे न्यायाधीशाला वाटले तर, तो आरोपीला विनादोषारोप सोडून देईल आणि तसे काण्यामागची आपली कारणे नमूद करील.

Exit mobile version