Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३७ :
व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे :
ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली तिने बंधपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे कलम १३५ खालील चौकशीअन्ती शाबीत झाले नाही, तर, दंडाधिकारी अभिलेखावर तशा आशयाची नोंद करील, आणि अशा व्यक्तीला केवळ चौकशीच्या प्रयोजनांसाठीच हवालतीत ठेवण्यात आले असेल तर तिला बंधमुक्त करील किंवा, अशी व्यक्ती हवालतील नसेल तर, तिला विनादोषारोप सोडून देईल.

Exit mobile version